Thursday, 10 March 2016

आभास

तत्व ,स्वभिमान ,प्रामाणिक पणा ,एकनिष्ठता ,बोलायला  किती सहज आणि  सोपे  शब्द  असतात  ना  ???
पण कधी  कधी  हे  शब्द आयुष्य मुश्कील करतात.कोणी  तरी आपले असावे असे प्रत्येकाला वाटते .काही नशीबवान  असतात त्यांना सगळे काही  मिळते .पण काहीना कोणी  नसते .आणि  त्याची त्याना सवय होते.
एक प्रकारची कठोरता  येवून  जाते मग स्वभावात.सगळ्या कडे  एक नजरेने  बघण्याची सवय होवून  जाते.
अचानक कोणी  येते आपुलकी दाखवते.पण ते समजतच नाही. एकाच नजरेने बघण्याची सवय झालेली असते ना ?
मग अविस्वास दाखवला  जातो समोरचा वर,नकळत कोणालातरी दुखावले जाते.
नंतर जाणीव होते त्यांचा असण्याची , पण उशीर झालेला असतो .
कोणी  खूप  जवळ येवून  दूर गेलेले असते .
आयुष्याच्या रखरखीत रस्त्यावरून एकटे चालतानी ....
कोणी असावे असे वाटते .......
दूर वरून कोणी येतांनी दिसते ..........
काही  क्षण मन सुखावते .........
पण  तो एक आभास असतो .........
कोणी तरी येण्याचा  .............

No comments :

Post a Comment