Thursday, 10 March 2016

आयुष्यात अनेकदा परिसा सारखे कोणी हवे असते.
पण नेहमी दगडच भेटलेले असतात.खडबडीत टोकदार हात आणि मन 
रक्तबंबाळ करणारे ,अचानक परीस हातात येतो.पण दगड  समजून त्याला फेकून देण्याची 
चूक होते.त्याचे अस्तित्व आणि मूल्य समजतच नाही.
जेव्हा समजते तेव्हा उशीर झालेला असतो .परीस हातातून गेलेला असतो .
पुन्हा त्याला मिळवण्याची धडपड व्यर्थ असते.
याला नशीब किवा नियती म्हणत असावं का ?

No comments :

Post a Comment