Friday, 24 June 2016

कधी न पुसल्या जाणाऱ्या आठवणी

कधी न पुसल्या जाणाऱ्या आठवणी 
सगळे पावसाची वाट बघत आहे .पाऊस सगळ्यांना हवाहवासा वाटणारा ,,,,,,,,,,,,
पण सगळ्या साठी वेगळाच असणारा,तो येतो कधी चोर पावलांनी कधी येतो .ढोल
नगारे वाजवत .तो येतो मग कोणाला आठवतात कविता कोणाला आठवतात
भजी तर कोणाला खुणवतात सह्याद्रीच्या वाटा ,आणि धबधबे ,तर कोणाला
नेवून सोडतात मनावर आघात झालेल्या वेदानाच्या गावी,मग कधी त्या असतात पुरात वाहून गेलेल्या ,डोक्यावर छप्पर हरवलेल्या माणसांच्या ...........
आज फेसबुक फ्रेंड ज्ञानदेव पोळ यांची पोस्ट वाचली .आणि चौथी मध्ये
असतानाची आठवण परत जागी झाली .छोटे गाव पक्के घरे कमी आणि कच्चे घरे जास्त .साधे मातीचे घर त्यावर उसाच्या पाचटाचे छप्पर .आमचे चुलीचे घर असेच होते .आईवडील शेतात मीआणि लहान दोन भाऊ शाळेत .दुपारी जेवणास घरी येत असू.एक दिवस दुपारी जेवायला घरी आलो .अचानक जोराचा वारा सुटला.वाऱ्याचा आवाज आल्याबरोबर दारा कडे धावले दार बंद कारे पर्यंत वारा आता घुसला आणि सगळे छप्पर उडून गेले .भीतीने तिघे एकमेकाला पकडून बसलो .वारा शांत झाला होता.पण घरात पसरलेल्या पालापाचोळाच्या रूपाने भीती सोडून गेला होता .त्या निरागस मनाला फक्त एकाच जाणवत होते आपले घर उडून गेले .आपण लवकर दार बंद नाही केले .आता आई मारणार .
भास होईल असा अंधार पसरला .अजून चैत्र पण संपला नव्हता अनेक ठिकाणी
लग्न चालू होती .मनी ध्यानी नसतानी वळवाचा पाउस आला होता.शेतकरी म्हणजे घरात कमी आणि त्याचा संसार बाहेर जास्त.अचानक आलेल्या पावसामुळे घर बाहेरील सामान आत घेण्या साठी धावपळ सुरु झाली कोण गोवर्या झाकतो कोण
वळ्याय झाकतो .पण पावसा कडे वेळ नव्हता त्याचा धीगाना सुरु झाला ,मोठ्या मोठ्या थेंब बरोबर आडवा तिडवा वारा सुरु झाला .घरात आई मी आणि भाऊ .दरवाजा बंद असून वाऱ्याच्या धडकेने दरवाज नक्की तुटणार यांभीतीने हाताने दरवजा दाबून ठेवण्याची केविलवाणी धडपड.त्याच वेळी दरवाज्या वरील एक पत्र
वर उचलला गेला आणि जोरात आपटला .आणि आईने देवाचा धावा सुरु केला .
एक पत्र उचकने म्हणजे घराचे छप्पर उडून जाणे.वखराची पास दरवज्याला आडवी लावली आणि धान्याच्या थाप्पीवर चढून उडणारा पत्रआईने दाबून ठेवला .घरातील चादरी पत्र्याच्या फटीत आम्ही दाबून ठेवल्या .त्याअर्धा तास वार्या बरोबर धीगाना घालणाऱ्या पावसात आम्ही देवाची पार्थांना करत होतो .
आर्ध्या तासाने पाऊस थांबला ,मनावर कधी न संपणारी भीती मनात बसवून .
येत असणार.आज मुंबईत राहते .मुंबईत नेहमी शांत पाउस पडतो तरी पावसामुळे अंधारून आले.वारा सुटला कि आज पण माझ्या मनाचा थरकाप होतो .नकळत मन माझ्या शेतकरी बंधावाच्या घरात जावून येते .मला नाही वाटत पावसात भजी खावी.माझे मन पुन्हा सुन्न होते .कुठे तरी कोणी तरी आशा असाच पावसाचा सामना करत असेल .कोणाला तरी असाच पाउस बेघर करत असेल , कोणच्या अंगणातील अनेक वर्षाचे मायाने जपलेले झाड उन्मळून पडत असेल .मागे एक भकास पणा सोडून .
आज असेच आठवणीतील काही


फेसबुक वर अश्याच एक पोस्टने आज त्या आठवणी मध्ये नेवून सोडले.
मध्ये काही वर्ष गेले नेहमी सारखा कडक उन्हाळा पण तो दिवस काही वेगळाच होता बघता बघता आकाशात काळे ढग जमा झाले .सकाळचे नौ वाजता रात्रीचा 
शेतकऱ्याचे जीवन असेच असते .अनेकांना असा अनुभव आला असणार काहीना 

No comments :

Post a Comment