Wednesday, 22 June 2016

असेच काही

आज बातम्या मध्ये एक बातमी दाखवत होते .एक व्यक्तीने ट्रेन समोर आत्महत्या केली .अश्या बातम्या आजकाल नेहमीच येत आहेत .आपण पण पण बघून च्यानल बदलतो .रोजमरे त्याला कोण रडे असे असते.
पण खोल विचार केला तर एक व्यक्ती स्वताच्या आयुष्याला कंटाळते आणि जीव देते .पण त्यावेळी तिथे अनेक वयोगटातील लोक हजर असतात .त्यांच्या मनावर अश्या घटनाच किती परिणाम होतो .रेल्वे पोलिस,रेल्वे कर्मचारी आणि मोटारमन 
हि माणसेच असतात.हि काय त्यांचे काम आहे असे आपण सहज म्हणून जातो.
सगळ्यात मोठा फटका बसतो तो प्रवास करणाऱ्या लोकांना .ट्रेन थांबते .रूळ साफ करणे .यासगळ्यात वेळ जातो .एक छोटी घटना पण अनेकांच्या जीवनावर असर करून जाते.जर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी जात असेल तर त्याच्या मनावर परिणाम होतो .त्याचा पेपर अवघड जावू शकतो .यामध्ये त्याची काही चूक नसते..
वाढती महागाई ,रोजचे टेन्शन ,कमी होत चाललेला संयम यामुळे माणूस मानसिक विकाराचा शिकार होत चालला आहे .सवांद कमी होत चालला त्याचा परिणाम आज एकटेपणा वाढला आहे .यातूनच टोकाचे निर्णय घेतले जातात .
पण जेव्हा अश्या आत्महत्या होतात तेव्हा कोणाला सहानुभूती नाही वाटत .उलट
लोक शिव्या घालत असतात ."त्याला मरायला ट्रेनच सापडली का ?"
आयुष्य सुंदर आहे तेअसे गमावू नका, माघार घेण्या पेक्षा चालत राहा मार्ग सापडेल

No comments :

Post a Comment