Saturday, 8 February 2020

तुम्ही कधी शाळेतून घरी पळून गेले आहेत का?

शाळा खूप आवडायची कारण चौथी पर्यंत आमची मुलींची शाळा होती.आमच्या बाई खूप छान शिकवायच्या.आमच्या वर्गा शेजारी चौथीचा वर्ग होता.त्या वर्गा वरील बाई खूप स्ट्रिक होत्या.सगळे त्यांना घाबरायचे।तेव्हा मी दुसरीला असेल.

तेव्हा शाळेत वर्षातून एकदा दोनदा नक्की आठवत नाही, इंजेक्शन दिले जायचे. दोन तीन नर्स यायच्या .बाईच्या टेबल वर स्टोव्ह ठेवून तो पेटवायच्या  त्यावर एका पातेल्यात गरम पाणी उकळत ठेवायच्या.त्यात सुया टाकायच्या.त्या वर्गात आल्या बरोबर बाई वर्गाचा दरवाज्या आतून बंद करून घ्यायच्या.

त्या काळात चौथी पर्यंत वर्गात खालीच बसण्याची पद्धत होती.नेहमी सारख्या बाई शिकवत होत्या.तेव्हा बाजूच्या वर्गातील बाई बरोबर नर्स येताना दिसली त्या बरोबर मी आणि अजून दोन मुलींनी पाटी पेन्सिल आणि पुस्तकांची पिशवी तिकडेच टाकून जोरात वर्गातून धूम ठोकली.

छोटे गाव जाणार तरी कुठे सरळ घरी.असे अचानक घरी आलेले बघून वडिलांनी विचारले.पाटी पुस्तक कुठे आहेत.तू आता घरी कशी.वडिलांना सांगितले शाळेत सुई मारायला आले आहेत म्हणून मी पळून आली आहे.वडिलांनी सरळ हाताला धरले आणि पुन्हा शाळेत घेऊन गेले.मग काय अर्ध्या गावाला आवाज जाईन एवढी रडारड करून काही फायदा झाला नाही.शेवटी इंजेक्शन घ्यायला लागेलच.बाजूच्या वर्गा वरील बाईंनी त्या नंतर शिक्षा केली ती वेगळीच.

त्यावेळी इंजेक्शनची खूप भीती वाटायची.अगदी लग्न होई पर्यंत.आता तर इंजेक्शन कॉमन झाले.

शाळेत पळून जाण्याची एकच घटना ही.त्या नंतर 12 वीला असताना वर्गात सर शिकवत असताना आम्ही तीन मैत्रिणी सरांना काही कळण्या आधी वर्गातून पळालो होतो.ते पुन्हा कधी.
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment