Thursday, 13 February 2020

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती.प्रामाणिक पणे वागणारी लोक होते.दिलेला शब्द पाळत होते.येण्या जाण्याची वेगवान वाहने नव्हती.त्यामुळे अनेकदा काही कोसाच्या अंतरावर सगळे नातेवाईक असायचे.

लग्न जमवताना अनेकदा वयस्कर माणसे पुढाकार घ्यायचे.तेच लग्न ठरवायची.मुलाने मुलीने पसंतीचा प्रश्नच नसायचा.यात बघितले जायचे ते घर आणि घरातील माणसे.ज्यांना नातेवाईक कमी आहेत गरीब आहेत अश्या लोकांची लग्न गावातील शहाणे लोक एकत्र येऊन जमवत.वयस्कर माणसाचा शब्द प्रमाण असायचा.

लग्न जमवणे,दोनाचे चार करणे हे पुण्याचे काम समजले जायचे.लग्न मोडणे पाप समजले जायचे.

आता ना माणसे प्रामाणिक राहिली ना शब्दाला किंमत राहिली.प्रवासा साठी वेगवान साधने आली.अनेक किमी.पर्यंत आता नाते संबंध जोडले जातात.त्यामुळे एकमेका बद्दल जास्त माहिती नसते.लग्न करण्याचे वय वाढले.मूल मुली एकत्र शिकतात.बरोबर राहतात.फोटो काढले जातात.

परंतु मी दुसऱ्या पेक्षा कसा मोठा वेगळा हे दाखवण्याची वृत्ती वाढली.संपत्ती मिळवताना ती कोणत्या मार्गाने येते या पेक्षा पैसा आहे ना ? हे मोठ्या पणाचे लक्षण समजले जाऊ लागले.बरं पैसे भरपूर आले .यातून शत्रू तयार होतात.कोणी प्रमाणिक पणे जरी मोठे झाले तरी त्याचे यश बघवतेच असे नाही.कधी कधी कोणाकडे काही नसते.परंतु मुले हुशार असतात.शिकतात मोठी होतात.

अनेक गोष्टी काही लोकांना मग बघवत नाही.कोणाचे सरळ आणि छान चालू आहे ना मग याना त्रास झाला पाहिजे…अश्या मनसिकते मधून लग्न मोडण्या सारख्या गोष्टी केल्या जातात.समोरच्या लोकांना अगदी काही जाऊन सांगितले जाते.माझ्या माहिती मधील एका मुलीचे लग्न जमले साखरपुडा झाला त्या नंतर त्या मुलीच्या सासरी जाऊन कोणी सांगितले मुलीला कोडे आहे.समोरच्या लोकांनी कोणती शहानिशा न करता लग्न मोडले.त्या नंतर त्या मुलीचे लग्न जमवताना खूप त्रास झाला.मुलगी खूप दिवस डिप्रेशन मध्ये गेली.ज्यांचे लग्न मोडले त्यांना भयंकर त्रास होतो.कधी कधी पुन्हा लग्न जमवणे अवघड होऊन जाते.

खरे तर आपण करतो ते चूक आहे हे माहिती असून फक्त असूया पोटी हे केले जाते.यातून कधी कधी ज्याचे लग्न मोडले त्याचे पुढे जाऊन चांगले होऊन  जाते.तर काहींच्या आयुष्यात कधी भरून न येणारे नुकसान होऊन जाते.

कोणाचे भले करता येत नसेल तर वाईट करू नका.जर वाईट आहे तर नक्की वाईट आहे सांगून कोणाचे भले होत असेल तर अश्या वेळी लग्न मोडण्या सारखे पाप होत असेल तरी ते पाप लागणार नाही.पण खरंच कोणी चांगले आहे तर त्याच्या बद्दल वाईट सांगून पापाचे धनी होऊ नका.कारण कोणाचा तळतळाट घेऊन आपण सुख नाही होऊ शकत.आपल्याच कर्माचा हिशोब येथेच होत असतो म्हणतात.

No comments :

Post a Comment