Sunday, 20 December 2015

माझ्या फेसबुक पोस्ट


एक स्मित हास्य कोणाला आपलेसे करण्यास पुरे असते .तेच स्मित कोणाकडे बघून उपरोधिक पणे केले तर आपले परके होवून जातात.






एखाद्या व्यक्तीचा खूप आदर वाटतो .ती असते आदर करण्या सारखी ...

सगळ्यांना मान देणारी .पण आपण तिचा बरोबरीचे असून तिला मान सन्मान मिळतो .यश तिचा पायाशी नेहमी लोळण घेते .आपण कुठे कमी नसतो तरी यश मिळत नाही. मग ज्यांना यश मिळते त्यांच्या बद्दल आधी असूया तयार होते.मग हळूहळू त्याचा नासूर होतो.आणि मग त्या व्यक्तीला शत्रू समजतो.सगळ्यात मोठा शत्रू.......पण असे का होते त्या व्यक्तीचा राग का येतो.राग नेमका कोणाचा असतो .आपल्या अपयशाचा का ?
समोरील व्यक्तीच्या यशाचा .समजत नाही .
मग यश मिळवण्यासाठी वाटेल ते ....
यश मिळते आणि अहंकार वाढतो ...
पण जाणीव असतेच आपण जे करतो त्याची...
असेच मनातले काही

यश मिळते आणि अहंकार वाढतो ...
पण जाणीव असतेच आपण जे करतो त्याची...
असेच मनातले काही






चित्रपट आपली संसकृती सांगत असतो .त्या काळात लोक कसे राहत होते किवा एखादी आदर देणारी व्यक्ती नक्की कशी होती ते जाणवून घायला कोणालाही आवडते पण ते साठी अभ्यास करावा "मुघले आझम' किवा उमराव जान हे चित्रपट आठवतात .अगदी त्या काळातील दागिने यावर सुद्धा बारीक विचार केला गेलेल्या दिसतो .कदाचित तेव्हा पैसे या पेक्षा कलाकृतील जास्त महत्व दिले जात असावे .
येणारा बाजीराव मस्तानी आल्या नंतरच समजेल कसा आहे .दोन्ही खांद्यावर पदर घेणाऱ्या पेशवाई मधील स्रिया बघायला भेटतात का ? आणिखी काही समजेल लवकर .
असेच मनातले काही

येणारा बाजीराव मस्तानी आल्या नंतरच समजेल कसा आहे .दोन्ही खांद्यावर पदर घेणाऱ्या पेशवाई मधील स्रिया बघायला भेटतात का ? आणिखी काही समजेल लवकर .
असेच मनातले काही







आजच्या पिढीला इतिहास वाचायला जास्त आवडत नाही .एक निरीक्षण .....त्यांना आवडते आज मध्ये जगायला ,पण इतिहास हा जेव्हा चित्रपट आणि मालिके मधून समोर येतो तेव्हा ते नक्की त्याबद्दल चर्चा करतात ,बघतात . पण गरज असते इतिहास नीट वाचण्याची तो समजून घेण्याची ,पुढील पिढी समोर तो जसा आहे तसा मांडण्याची .फक्त भव्य दिव्य करण्याकडे आणि केवळ बाजारात विकला जावा म्हणून त्यात नको ते घुसवून ,चुकीची माहिती देणे पण बरोबर नाही ना ?

No comments :

Post a Comment