एक व्यक्ती कधी दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते .अगदी मग ते दिसणे असो कि बोलणे .चालणे. आणिहि विचार सुद्धा हे माहिती असून अनेकदा अनेक "मी नाही तुझा सारखा .किवा मी नाही त्याचा सारखा "असे वाक्य का बरे बोलत असतील .
स्तुती आवडत नाही असे कोणी भेटणार नाही ,फक्त ती किती खरी किती खोटी हे ओळखता आले पाहिजे .
नाही ओळखता आले तर अधोगती ठरलेली
आयुष्यात काही दिवस विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाही .कुठे तरी वाईट आठवणी मनावर घाव करून गेलेल्या असतात .त्या आठवणी जर हलाखीच्या परस्थिती मधील असतील तर त्या नेमक्या आनंदाच्या क्षणी आठवतात .मग नकळत डोळे कधी भरून येतात ते पण समजत नाही .
अपमानाचा घाव म्हणजे सुदर प्रतिबिंबाला गेलेला नाजूक तडा .जो कधी भरला जात नाही
अतिशय खरी आणि वास्तव म्हण .......
सगळे सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही .........
आणि पैशाच ठरवतो माणसांची किमत ........
कमीतकमी आजच्या जगात तरी .......
कोणती गोष्ट जेव्हा नवीन असते तो पर्यंत तिचा बद्दल आकर्षण असते ,तिचा बद्दल ओढ असते .नंतर येणारा तोच तोच पणा यामुळे मग त्यातील आकर्षण संपून जाते .मग ती गोष्ट नकोशी वाटते .मग ते काही असो .एखादी वस्तू .अथवा एखादी व्यक्ती किवा आणखी काही .खरे तर माणसाचे मन हे चंचल असते .त्याला नेहमी नवीन काही हवे असते .मग त्या साठी जुने मागे पडते .नकळत .....
कोणी तरी वर्षानुवर्षे आठवणी काढावी,नतमस्तक व्हावे ,असे महान कार्य कारावे लागते.त्यासाठी लागते प्रचंड मेहनत आणि जिद्द मग तेव्हा ती ठरते समाज बदलाची मोठी नादी.........
No comments :
Post a Comment