Sunday, 20 December 2015


काही लोक कारण नसतानी दुसर्यांना रडवण्यात धन्यता मानतात तर काही लोक कारण नसतानी दुसर्यांचे आसू पुसण्यात धन्यता मानतात .१७ feb




पैशाने दिखावा करता येतो माणसे विकत घेता येतात .माणसे गोळा करता येतात .पण माणुसकी आणि चागले पणा पैशाने नाही मिळत .



वेदना झाल्या कि डोळ्यात पाणी येते .पण ते वेदनेचे आहे हे समजायला मन तसे असायला हवे .नाही तर ते रडगाणे वाटणारे त्यावर हसणारे एक दिवस रडतात .
आपण कोणाला हसलो कोणच्या दुखावर हसलो हे समजून पचात्ताप होतो पण तेव्हा वेळ गेलेली असते .देवाच्या लाठीला आवाज नसतो बोलतात .तसे होते .ती कधी तरी पडते मग जसे करावे तसे भरावे याचा अनुभव येतो .आज आहे तो उद्या राहीलच हि समज माणसाला एक दिवस नियती नक्की चपराक देते .{17feb}
‪#‎असेचमनातलेकाही‬


नको ते बोलून आत्मविस्वास घालवणारे असतात तसेच पुढे येवून उम्मीद देणारे असतात .तेव्हा समजून जा तुम्ही चुकत नाहीत .


दोन शब्द मनापासून कोणाशी बोला ,कोणाच्या चेहऱ्यावर नक्की हसू दिसेल .दोन शब्द रागाने बोला ,हसरा चेहरा नक्कीच रडवा होईल .आपण काय करायचे ते आपण ठरवायचे .{२२ feb १५ }



व्यक्ती जेव्हा शून्यातून यशाच्या शिखरावर पोहचते .तेव्हा त्याच्या बरोबर असतात प्रामाणिक जीवाला जीव देणारी माणसे,त्यांना कशाची अपेक्षा नसते.
आपली व्यक्ती मोठी होणे यातच त्यांचे समाधान असते.यशस्वी व्यक्ती विसरत नाही आपल्या जीवाला जीव देणाऱ्या माणसाना .......पण वेळ बदलते यशस्वी व्यक्ती भोवती स्तुती करणाऱ्या स्वार्थी लोकांचा गराडा पडतो.नाविलाज असतो किवा यशाची हवा डोक्यात जाते.नकळत जीवाला जीव देणारे हळूहळू दूर होत जातात.यात दोष कोणाचा असतो .परस्थिती नुसार बदलता न येणाऱ्या माणसांचा ....
कोणतीही गोष्ट अति झाली कि ती नको वाटते .मग ती किती आवडणारी असली तरी .


नावे ठेवणे हा मनुष्य स्वभाव आहे आणि असतो .मी नाही तसा किवा तशी असे किती म्हटले तरी हा गुण प्रत्येका मध्ये असतोच .पण मला नेहमी वाटते एखादी व्यक्ती अशी का वागते याचा विचार जर त्याच्या जागी जावून केला तर ,आपण त्या व्यक्तीला समजून तर घेऊ शकतो ,आणि जमेल तशी मदत करू शकतो असे मला वाटते .



आयुष्यात छोट्या गोष्टींना खूप महत्व असते.पण त्यांना छोट्या समजण्याची चूक केली तर त्या पुढे जावून खूप मोठ्या होतात .







No comments :

Post a Comment