आज सोशल मीडिया वर एक पोस्ट अनेकदा समोर आली ती म्हणजे .
"आमचा हरवलेला सांता"
या मध्ये वासुदेवाला उद्देशून लिहिले आहे.जो आता दिसत नाही।कारण त्याची ओळख आम्ही आमच्या पिढीला करून दिली नाही.
मला तर आता वासुदेव दिसत नाहीत म्हणून उलट बरे वाटते.कारण सकाळी सकाळी वासुदेवाचे रूप घेऊन फिरणारा तो समाज आता काळानुसार बदलला आहे बदलत आहे.याचा आनंद वाटतो आहे.
खेड्यातील असल्यामुळे डोंबारी,नंदीबैल वाले,व्हरडी आईचे खोके डोक्यावर घेऊन जाणारे,स्वतःच्या अंगावर सोटा मारून घेणारे खुप जवळून बघितले आहे.आज या गावात मग त्या गावात फिरत राहायचे.ज्या गावात जाणार त्या गावातील मोकळी जागा बघून त्यावर आपली पाल ठोकायची.त्या गावात आणि आजूबाजूच्या गावा मध्ये फिरायचे.जे मिळणार ते घेऊन यायचे.
ती पण माणसेच आहे त्यांना पण इच्छा,अपेक्षा आहे याचा कोणी विचार करत नव्हते.स्वतंत्र मिळून त्याना आपल्या सविधान नुसार शिक्षणाचा अधिकार मिळाला.त्या समाजातील मुले आज शिकत आहेत कुठे तरी स्थिर होत आहेत.त्यांना जाणीव झाली आहे आपल्या हक्काची अधिकाराची.
वासुदेव आता हरवला म्हणणारे लोक येथे लिहिताना हे विसरतात की जेव्हा वासुदेव येतो तेव्हा त्याला आपल्या सोसायटी मध्ये घुसू न देणारा एक वर्ग आहे.
उलट आज ते दिसत नाहीत म्हणजे त्यांनी प्रगती केली हे नक्की.समजा नसेल केली तरी त्यांनी आपले जगण्याचे साधन नक्की बदलले आहे हे मात्र खरे आहे.किती दिवस तो वेष करून त्यांनी लोकांच्या दारा समोर उभे राहायचे.चार दोन रुपये किंवा पसा भर धान्य कोणी देईल याची वाट वघायची.
माझ्या लग्न आधी एक वासुदेव दुसऱ्या गावावरून यायचा.बाजार असायचा त्यादिवशी तो गावात यायचा.आमच्या घरी यायचा बरोबर आणलेली भाकर तुकडा सोडून खायचा.कधी स्वयंपाक झाला असेल तर आई त्याला जेवायला द्यायची.मग आपल्या पोतडी मधून तो सामान काढून वासुदेवचे कापडे घालायचा.काखेत झोळी अडकवून तो गाणे म्हणत चालायचा.त्याचे पायातील ते कडे छम छम वाजायचे.डोक्यावर मोराच्या पंखाची टोपी घालून कपाळावर टिळा लावून गाणे म्हणत म्हणत तो गोल गोल फिरायचा.लहान असल्यामुळे त्यात गंमत वाटायची.परत जाताना कधी कधी तो उदास दिसायचा पण तेव्हा ते समजायचे नाही.त्याला त्या दिवशी धान्य केव्हा पैसे कमी मिळायचे.
आई वडील शेतात राहायला गेले.माझे लग्न झाले आणि या सगळ्याचा विसर पडला.मागे चार पाच वर्षांपूर्वी अचानक एका ठिकाणी तो भेटला.लगेच ओळखले त्याने ,जवळ आला चौकशी केली.त्यांना विचारले अजून येता तुम्ही वासुदेव बनून.
त्यावर तो बोलला नाही ताईसाहेब आता मुले मोठी झाली शिकली कामाला लागली आता नाही मी फिरत.त्यांच्या साठी कष्ट घेतले ते कामाला आले अजून काय पाहिजे.
पसाभर धान्य आणि काही पैसा साठी फिरणारा त्याच्या घरातील तो शेवटचा होता बघून खूप बरे वाटले होते.असा सांता हरवलेला कधी चागले.राहिले नाताळ वेळी येणाऱ्या सांता बद्दल.ते एक काल्पनिक पात्र आहे.ते कोणा कडे मागायला जात नाही.ते असेल ते दुसऱ्यांना देऊन आनंद वाटत असतो.त्याच्या बरोबर कधी वासुदेवाची तुलना होऊ शकत नाही.जे करतात त्याना अजून तो समाज आहे तसाच रहावा असे वाटते का?असा प्रश्न नक्की पडतो.
असेच मनातले काही.
फोटो गुगल सर्च
No comments :
Post a Comment