"फुटकी काच यांची कधी माहिती नाही?" हे वाक्य अनेकांनी आपल्या आई आजीच्या तोडून नक्की ऐकले असेल.सून माहेरी गेली की बांगडया भरून आली पाहिजे अशीच काही रीत होती.दिवाळीत तर हमखास लेकी आणि बहिणी बांगडया भरूनच जात
जशी साडी हा स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तश्या बांगड्या हा देखील स्त्रीच्या आवडीचा विषय आहे.लग्नात मानपानाला फार महत्व असते.
जेव्हा घरात मुलाचे किंवा मुलींचे लग्न असते.तेव्हा अनेक गोष्टी असतात त्यात बांगड्या भरणे हा एक सोहळा असतो(म्हणजे अलीकडे प्रमाण कमी झाले)खेड्यात अजून ही प्रथा आहे.
गावातील बांगड्या भरणारा कासार बोलावला जातो.मग तो आपल्या मोठया मोठया पिशवीतून बांगड्या घेऊन येतो.अनेक रंगांच्या ,अनेक डिझाईनच्या.सुंदर सुंदर बांगड्या.जावा,नंदा,मैत्रिणी शेजारी राहणाऱ्या महिला मग जमतात.जवळच्या त्या अगदी एक हातात दोन दोन डझन बांगडया घालून घेतात.मुद्दाम देखील घातल्या जातात.फुकट मिळतात म्हणून😂
काही फक्त मान म्हणून दोन दोन बांगड्या घालून घेतात.हा सोहळा जसा लग्न आधी होतो तसाच वधू माहेरी जाताना चुडा उतरवण्या वेळी होतो.नवरी आणि तिच्या करवल्या याना बांगड्या भरल्या जातात.
कधी काळी काचेच्या बांगड्या स्वस्त होत्या आता मात्र दीडशे पासून पाचशे पर्यंत डझन बांगड्या मिळतात.अलीकडे याचे बिल दहा हजराच्या पुढे जाते.म्हणून आता पूर्वी सारखा आग्रह केला जात नाही.अलीकडील मुली फार तर सहा बांगड्या पुढे बांगड्या घालत नाही.
पूर्वी जर बांगड्या साठी आग्रह केला नाही तर पुढील अनेक वर्ष ऐकावे लागायचे."लग्नात लाख खर्च केला पण बांगडीची फुटकी काच नाही भरली"किती साधी माणसे आणि किती साधी अपेक्षा असायच्या ना??
अलीकडे लग्न म्हणजे इव्हेंट झाला.लग्न कमी आणि फोटो साठी केलेली प्रत्येक कृती जास्त वाटत असते.
आज आई कुठे काय करते या मालिकेत बांगड्या भरण्याचा एक सीन बघून आठवले.
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment