Thursday, 29 July 2021

कोणाशी तरी बोला

कोणाच्या तरी आत्महत्याची बातमी येते आणि मन उदास होऊन जाते.निराशा हतबलता काहीच न सुचने .आपला कोणाला उपयोग नाही आपल्या साठी कोणी नाही ही भावना इतकी तीव्र असते की .जगाचा विसर पडतो जगात फक्त आपण खूप दुखी आहे ही एकच भावना प्रबळ होते आणि टोकाचे पाऊल उचलले जाते.
एखादी व्यक्ती आत्महत्या करते त्यानंतर अनेक बोलतात.आत्महत्या हा का उपाय आहे का ? आत्महत्या कमजोर लोक करतात.कोणा जवळ बोलावे मन मोकळे करावे.
काय गंमत आहे ना मन मोकळे करावे बोलणारे लोक जर मनातले बोललो तर बोलतात काय रडगाणे चालू असते नेहमी .किती जण आहे असे कोणी दुःखात असेल तर समजून घेतात.आज एक ग्रुप मधील नेहमी पोस्ट मधून भेटणारा एक असाच जग सोडून गेला .मनात प्रचंड घालमेल घेऊन गेला असेल.
कोणी तरी आत्महत्या केली की मला माझे नैराश्याचे दिवस आठवतात.कमी वयात झालेला संधिवात त्यामुळे कोणती काम न करता येणे.याचे होणारे प्रचंड दुःख.आपला जगून काय फायदा असे टोकाचे विचार कधी काळी मनात येत .कोणाला सांगणार मग माझ्या सुरवातीच्या अनेक पोस्ट असाच असायच्या .निराशेने भरलेल्या .मी कधी काळी आत्महत्ये वर अनेक पोस्ट लिहिल्या .मृत्यू म्हणजे सगळ्या मधून सुटका असे मला वाटायचे.मनातली घालमेल माझा पोस्ट मधून बाहेर पडत असे.पण मला नाही आठवत मला कोणी विचारले तुला काही त्रास आहे का?
उलट मला नावे ठेवणारी भेटली .काय बघावे तेव्हा रडगाणे गाते.किती निगेटिव्ह लिहिते.पण असे का?
हे कधी कोणी नाही विचारले.कधी तरी कोणाला सांगून बघितले आपले समजून त्यांनी काय केले .स्वताचे कर्तव्य असल्या सारखे दुसर्यांना सांगून माझा मजाक उडवला .माझा बद्दल जेवढे बोलता येईन तेवढे बोलून घेतले.
कोणी आत्महत्या करते तेव्हा येणाऱ्या कॉमेंट असतात कोणाशी बोलायला पाहिजे होते.पण तो कोण भेटत नाही आणि एक जीव प्रचंड निराशेने जातो.
गरज असते स्वताच सावरण्याची ,काही तरी जगण्याचे कारण शोधण्याची ...
मग कळते आयुष्य समजतो तेवढे वाईट नसते.
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment