Thursday, 22 July 2021

माफ करावे

सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत अनेक लोक आपल्या संपर्कात येत असतात.काही आपलीच असतात तर काही नवीन भेटत असतात.कधी आपण चुकतो कधी समोरचा.चुके मुळे कधी कधी आपल्याला त्रास होतो कधी समोरच्यानं.....
आपली चूक असेल तर सरळ माफी मागतो.अर्थात आपल्या माफी मगण्यामुळे समोरच्याला झालेला त्रास कमी होणार नसतो.परंतु आपल्याला मनाला लागणारी बोच तरी कमी होते.

हेच कधी कधी समोरच्याकडून घडते.कोणी माफी मागतात कोणी नाही.आपले जर नुकसान जास्त असेल तर आपण माफी मागितली की माफ करूनही टाकतो.पण जे लोक माफी मागत नाही त्यांच्या बद्दल मनात राग राहून जातो.म्हणतात ना"माणूस आनंदाचे क्षण विसरतो पण कोणी केलेला अपमान किंवा नुकसान विसरत नाही"

काही लोकांचे काही बिघडवलेले नसते तरी सहज ती लोक येता जाता अपमान करतात.टोकाचे मन दुखेल असे बोलतात.आपल्याला काळातच नाही आपण त्यांचे काय बिघडवले.आधी आधी आपण रिऍक्ट करतो.त्याचा त्रास आपल्याला होतो.नंतर आपल्याला सवय होते.आपण इग्नोर करतो.पण जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्या तोंडातून रागाने अपशब्द बददुवा निघून जातात.खरे तर आपल्यालाच ते पटत नाही रागात निघून जातात.त्या व्यक्तीचे काही वाईट होते की नाही माहिती नाही पण बोलतात आपलेच शब्द कधी कधी आपल्याला लागतात.जर तुम्ही संवेदनशील असाल तर आपण असे कसे बोललो याचा त्रास होतोच होतो.

अनेकदा आपण मनात कोणता स्वार्थी न ठेवता मदत करतो.काम झाला की ती व्यक्ती आपल्याला विसरून जाते.मग ती कधी जवळची असते कधी दूरची.जवळची असेल तर ती रोज आपल्या समोर असेल तर त्रास होतो.मग किती त्रास करून घ्यायचा नाही म्हटलं तरी.याउलट दूरच्या लोकांना आपण सहज मनातून काढू टाकू शकतो.

आता अश्या लोकांना आपण एक नाकरात्मक विचार घेऊन आठवणीत ठेवतो.त्याना माफ करू शकत नाही.

माफ करता यायला हवे  ...मागची पाटी पुसून नाविन लिहिता आले पाहिजे.हे जमायला हवे.मग त्या व्यक्तीशी संबंध ठेवायचा नसेल तरीही.मी अतिशय संवेदनशील आहे.पण मला माफ करणे जमत नव्हते अजून पण तेवढे जमत नाही.सरळ त्या लोकांना आयुष्यातून वजा करून मी पुढे जाते.

माझ्या वडीला आणि माझ्या मध्ये खूप चांगली बॉडिंग होती.टोकाचे धार्मिक होते ते.उठता बसता पांडुरंग पांडुरंग चालू असे.कधी कोणाला वाईट शब्द बोलताना बघितले नाही.कायम धार्मिक गोष्टी सांगत राहायचे त्यातून अनेक दाखले द्यायचे.

कोणी किती अपमान केला वाईट बोलले तरी काही बोलत नसत.यावर त्याना विचारले तर बोलत पांडुरंग घेईल बघून.त्यांचे आणि माझे नाते काय? नाते आहे ते या देहाशी.देह संपला की संपले सगळे.प्रत्येक जण काही निमित्तानेच आयुष्यात येतो.वाटायचे त्यांची आई ते दोन वर्षाचे असताना गेली होती म्हणून याना ऐकून घेण्याची सवय लागली असावी.2014 मध्ये ते गेले.

मागच्या वर्षी कोविड आला एक एक जवळची माणसे गेली आयुष्याची क्षण भंगुरता जाणवली.देह संपला सगळे संपले राग लोभ.मग  ठरवले ज्यांचे मन दुखावले गेले असेल त्यांची देवा कडे माफी मागितली.ज्यांनी माझे मन दुखावले त्याना माफ करून टाक म्हणून  देवाला पार्थना केली.सगळ्यांना समोर जाऊन तर माफी नाही मागू शकत ना???कारण आपण मनापासून मागू पण त्यांनी करायला हवे ना?कधी कधी उलट अजून वाईट दोन शब्द ऐकायला लागू शकतात.
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment