Sunday, 1 August 2021

मालिका आणि आपण

अनेकदा मालिका चांगल्या नसतात म्हणून अनेक जण येथे लिहितात .
मी जास्त मालिका बघत नाही बातम्या बघत असते.नाही तर गाणे ऐकते .
माझ्या लग्नाच्या आधी आमच्या घरी टीव्ही नव्हता.तसे तेव्हा खेड्यात सगळ्याकडे टीव्ही नसत.मला तेव्हा टीव्हीचे खूप आकर्षण होते.लग्न झाले मुंबईत आले.तेव्हा आमच्या कडे कलर टीव्ही नव्हता.पण टीव्ही आहे हेच माझ्यासाठी खूप होते.
तेव्हा मुबई मध्ये दोन च्यानल होते मुबई साठी मेट्रो म्हणून {नक्की आठवत नाही पण हेच नाव असावे }त्यावेळी रविवारी छान मालिका असत म्हणून लवकर उठून सगळी कामे करून टीव्ही बघणे हा आवडता कार्यक्रम असे .पण आज मी मालिका बघत नाही.
आता मी हे का सांगत आहे .......
अनेक घरात महिला अतिशय मालिका बघत असतात.हे अगदी शहरात नाही तर
खेड्यात देखील.हे मी निरीक्षणातून लिहित आहे.शहरात गृहिणी असतात काही काम नसते वेळ जावा म्हणून यात महिला अडकतात.तर खेड्यात काम असून देखील एक वेगळे जीवन मालिके मधून समोर येते म्हणून अनेक महिला या मालिका बघत असतात.खेड्यात मालिके मधून दिसणारे मोठे घरे, भारी साड्या
या सगळ्याचे खूप वेड दिसून येते.किवा सासू कशी वागते सून कशी वागते हे बघणे त्यांना आवडते.
पण एक गोष्ट खरी आहे जश्या महिला मालिका बघतात तसे अनेक पुरुष
देखील या मालिका वेडे दिसून येतात.
मी आज हे सगळे लिहित आहे कारण आज मालिका बघून त्यातील पात्र आणि
त्यांच्या जीवनात जे घडते त्याचा काही महिला वर खरच परिणाम होतो
त्या नकळत एखाद्या पात्रा बरोबर भावनिक जोडल्या जातात.
अगदी ती व्यक्ती आपली कोणी आहे असे त्यांना वाटते. मग तिचे सुखदुख त्यांना आपले वाटायला लागते.
अशीच एक माझ्या ओळखी मधील एक चाळीश पंचेचालीश ची महिला काही वर्षा
पूर्वी येणारी मालिका सात फेरे बघत असे त्यातील सलोनी म्हणजे आपली मुलगी आहे असे त्या महिलेला वाटायला लागले.तिचा बरोबर काही चांगले घडले दाखवले कि हि एकदम खुश सगळ्यांना सांगणार बघा आज सलोनी बरोबर हे झाले ते झाले.काही वाईट दाखवले कि दिवसभर दुखी,मग तिचा दिवस वाईट सगळ्यांना तेच सांगत राहणार बघा कसे होते तिचा बरोबर,
आधी आधी सगळे ऐकत नंतर तेच तेच मग कोणी लक्ष देत नसे.
तिच्या मुलांनी तिला ते पात्र करणाऱ्या त्या मुलीला भेटून देखील आणले
दिवसभर शुटींग दाखवले जे करतो ते खोटे असते हे समजावले.
पण काही फायदा झाला नाही.मालिका आणि त्या बद्दलचे वेड वाढत गेले.
घरातील टीव्ही काढून टाकला मग ती कोणच्या घरात जाऊन टीव्ही बघत असे.
कधी कोणी भेटले तर फक्त मालिके बद्दल बोलत असे.हळूहळू तिला बायका
टाळू लागल्या.
एकदा तर ती त्या मालिकेच्या निर्मात्या बरोबर जाऊन वाद घालून आली,
तुम्ही असे का दाखवतात म्हणून.आता ती ठीक आहे .पण तेव्हा पासून मात्र
माझे मालिका वेड कमी झाले.कारण माझ्या पण लक्षात आले.आपण एखादी मालिका जेव्हा बघतो तेव्हा नकळत आपल्या आवडत्या पात्राच्या सुखदुखात नकळत सामील होतो .त्याचा असर थोडा तरी होतो.
तेव्हा पासून टीव्ही बघायचा पण उद्या काय होणार अश्या मालिका बघायच्या नाही .एखादा चित्रपट बघायचा विसरून जायचे.त्यात उद्या काय होणार याचे टेन्शन नसते .
असेच मनातले काही
आशा ६/६/१५

No comments :

Post a Comment