Sunday, 25 July 2021

विज्ञान शाप की वरदान

शाळेत असताना नेहमी एक विषय निबंधा साठी असायचा "विज्ञान शाप की वरदान"त्यावेळी दहा मार्क्स मिळणार म्हणून निबंधाच्या पुस्तकातून पाठ करून पेपरात लिहिला जायचे.त्यावेळी मनात विचार देखील कधी आला नाही.पुढे जाऊन खरच येणारे नाविन तंत्रज्ञान वरदाना बरोबर शाप ठरेल.माणसांना माणसा पासून दूर घेऊन जाईन.

पर्यावरणात जसा बदल होत चालला तसे जगणे अवघड होतं चालले आहे.कधी काळी नदया नाले भरून वाहत असायचे तिथे आज पिण्यास पाणी नाही.शांत असणारी गावे आज आधुनिकतेचे वारे लागल्या मुळे आता गावचा शांत पणा हरवून बसले आहेत.गावाकडील लोकांना शहरी वातावरण मोहावत आहे.प्रत्येकला आज सुख सुविधा हव्या आहेत.कोणाला चालणे आता नको आहे.त्याचा परिणाम दरवर्षी वाढणारी वाहने त्यामुळे होणारी रहदारी.त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारा उशीर,कर्कश हॉर्न यामुळे होणारी चिडचिड.नको तिथे निघणार राग.यातून माणसं मानसिक आजरा मुळे त्रस्त आहेत.कुठे तरी तो आपले पणा शोधत असताना दिसत आहे.

आपल्या कडे आहे त्यात समाधान मानण्या पेक्षा त्याला दुसऱ्या कडे जे आहे ते आपल्या कडे हवे आहे.यातून कोणी सुटत नाही.माणसांना भुलवणारे तंत्रज्ञान आले.आधी आला टीव्ही ....
एकमेकांशी गप्पा मारणारे एकमेकांना कडे जाणारे लोक मग स्वतःच्या घरात तासनी तास टीव्ही बघत बसू लागली.घराच्या दारा बरोबर मनाची दारे बंद करून बसू लागले.समोर दिसते त्याला खरे समजून तसे जगण्याचा प्रयत्न करायला लागले.

त्या नंतर आलेल्या मोबाईल मुळे तर माणसे अजून एकटी होत चालली.चोवीस तास मोबाईल हातात त्यात असणारे इंटरनेट त्यात असणारे अनेक ऍप ,एक क्लिक वर मिळणारी माहिती.त्यात मोठी भर म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट.

आधी एखादी गोष्ट माहिती नसेल तर कोणाला तरी विचारण्या शिवाय पर्याय नसायचा.नाही तर पुस्तकात शोधायला लागायचे.म्हणजे काय कोणाशी तरी सवांद साधायला लागत असे.पण आता त्याची कोणाला गरज वाटत नाही.अगदी एका घरात राहत असून एकमेकांना काही विचारावे वाटत नाही.पण दूर वर राहणाऱ्या लोका बरोबर तरी बोलत असतात.सवांद तर हवा पण आपल्या माणसा बरोबर नाही.यातून काय होत आहे माणूस सारखा मोबाईल मध्ये गुंतून राहत आहे.

हळूहळू अनेकजण मोबाईल अडीक्ट होत चालले आहे.हे अनेकांच्या लक्षातच येत नाही.कोणाला फेसबुक हवे तर कोणाला गुगल ....

यामुळे अनेकदा आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचा विचारच नाही.पण याचा त्रास मात्र आपल्या जवळील लोकांना होतो.आपल्याला घरातील माणसा वर लक्ष ठेवायला हवे.आपल्याच घरातील सदस्य मोबाईल ऍडिंक्ट तर होत नाही ना ?यावर लक्ष ठेवायला हवे.जेणे करून आपण त्यातून त्यांना वेळीच सावरू शकू.
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment