कालच पौर्णिमा झाली.शहरात काय अमावस्या आणि पौर्णिमा...
माझे लग्नाआधीचे आयुष्य खेड्यात गेले.भरपूर मोठे अंगण होते.बहुतेक सगळे रात्री 9 पर्यंत झोपायचे.माझ्या घरा जवळून नाशिक शिर्डी रोड गेलेला होता म्हणजे आज ही आहे.रात्री 9 वाजता नाशिक सोलापूर गाडी आली की 9 वाजले समजायचे.कारण घरात घडयाळ नव्हते.
गावाच्या ज्या भागात मी राहायचे त्या भागात मी 10 वीला जाई पर्यंत लाईट नव्हत्या.गावातून गेलेल्या रस्त्यामुळे गाव दोन भागात विभागले गेले होते.एक बाजू म्हणजे गाव आणि दुसरी बाजू म्हणजे खळवाडी.
खळवाडी म्हणजे सगळे खळे....त्यातच घरं....घराच्या मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला शेतात आलेले पीक ठेवले जायचे.धान्य तयार करायला खळे असायचे.असे अनेक घरे मिळून खळवाडी.
म्हणून आमच्या बाजूला लाईट उशिरा आलेली.आज आठवते जेव्हा लाईटचे पोल नुसते आले तरी आम्ही आनंदाने नाचलो होतो.परंतु घरात लाईट मात्र घेतली नव्हती माझे लग्न झाले तरीही.
हे सगळे आठवले कारण खूप दिवसांनी मुंबईत काल पूर्ण चंद्र बघितला.जो चंद्र रोज बघायला मिळायचा त्याचे दर्शन मुंबईत मात्र दुर्लभ झाले आहे.चंद्राला चांदोबा,चांदो मामा म्हणायचो.तो लहान असताना खूप आवडायचा कारण पौर्णिमेच्या आधी चार पाच दिवस व नंतर चार पाच दिवस त्याचा लख्ख आणि शांत प्रकाश सगळी कडे पसरायचा.त्या प्रकाशात अंधार गायब होऊन जायचा.अंगणात खेळता यायचे.बसून गप्पा मारता यायच्या.शेजारच्या खळ्यात जाण्यास भीती वाटायची नाही.घरातील दिव्याच्या प्रकाशा पेक्षा बाहेर जास्त प्रकाश असायचा.
कोणा कडे टीव्ही नाही रेडिओ नाही.घड्याळ नाही.एकदा अंधार पडला की सगळे स्वतःच्या घरात गुडूप होऊन जायचे.9 ची गाडी आली म्हणजे खूप उशीर झाला असे वाटायचे.चंद्रप्रकशात आजूबाजूची झाडे,घरे स्पष्ट दिसायचे.सगळे कसे स्थितप्रज्ञ वाटायचे.एक वेगळी शांतता होती.जी कायमची हरवली आहे.
आज सगळी कडे नुसता प्रकाश आहे.रात्री दिवसाचा भास होतो.पण हरवला आहे तो चंद्र....तो प्रकाश
विसरलो आहे पोर्णिमीची वाट बघणे.
कधी तरी आठवणी गावच्या गल्ली बोळात घेऊन जातात.इतकंच.
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment