Tuesday, 5 April 2016

मत

आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात.काही बरोबर आपले छान जमते .तर काही लोक कारण
 नसतानी आवडत नाहीत .त्यांनी आपले काही बिघडवलेले नसते तरी सुद्धा.
पण काही लोक अगदी थोडा वेळ भेटतात आणि कायमचे लक्षात राहतात.तर काही बघितल्या बघितल्या

 आपली वाटतात. पण आपण हे सगळे तेव्हा ठरवतो जेव्हा आपण त्या व्यक्ती बरोबर बोलतो.
ती व्यक्ती आपल्याशी बोलते .तेव्हा आपण त्या व्यक्ती बद्दल आपले मत बनवतो.म्हणजे त्या व्यक्ती बद्दल 
तो आपला अनुभव असतो.पण अनेकदा एखद्या व्यक्ती बद्दल आपल्याला जो अनुभव येतो तो बाकीच्यांन
 येईन असे नाही. अनेकदा एखाद्या व्यक्ती बद्दल फक्त ऐकून मत बनवले जाते ." अमुकअमुक व्यक्ती 
चांगली नाही " असे सहज बोलणे कधी कधी दुसर्यांच्या मनात मोठा गैरसमजकरून जातो .म्हणून कधी 
कोणा व्यक्ती बद्दल ऐकीव माहिती वर कधी मत बनवू नाही आणि बोलू पण नाही.

एखादी व्यक्तीला आपण भेटतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आवडते म्हणजे काय ?
कोणाचे बोलणे 

आवडते,तर काहीचे व्यक्तीमत्व ,तर कोणाचे हसणे,तर कोणाचे बोलणे.कोणाचे लिखाण आवडून जाते.नाही का ?
फेसबुक आभासी जग येथे कधी पोस्ट वरून तर कधी फोटो वरून एक मत बनवले जाते.आणि
 जेव्हा ती व्यक्ती समोर येते तेव्हा जाणवते .आपण चूक
होतो का बरोबर .अनेकजण छान लिहितात म्हणजे ते वास्तव जगात छानच
बोलतील असे नाही ,अनेकांना लिहून व्यक्त होता येते तसे बोलता येईनच असे नाही तर काही

 येथे काही न लिहिणार वास्तव जगात मात्र खूप छान बोलतात .
त्यांचे मते मांडतात .शेवटी काय येथे आपण जसे असतो तसेच वास्तव जगात
असूच असे नाही .म्हणून कधी त्या व्यक्तीला भेटा बोला मग त्या व्यक्ती
बद्दल एक ठाम मत बनवा .

कधी कधी बनवलेले मते चुकु देखील शकतात ,मग मात्र आपण माणसे
ओळखायला चुकले असे देखील होते.
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment