चव
माझी आई ना खूप छान जेवण बनवते .मला तर माझ्या आईच्या हाताचे जेवण
खूप आवडते ,असे आपणच नाही तर आपल्या आजूबाजूला असणारे मग ते कोणी असो नातेवाईक मित्र सगळ्यांना आपल्या आईच्या हातचे जेवण आवडत असते .
मग जगातील कुठे किती चवदार काही खाल्ले असेल तरी सुद्धा आपली आईच जगातील
बेस्ट कुक वाटते .
असे का बरे ?
आपण जेव्हा पासून अन्न खाण्यास सुरवात करतो तेव्हा पासून आईच्या हाताने खातो .
तिनी बनवलेले खात असतो .{कधी याला अपवाद आज्जी किवा आणखी कोणी असते }
अन्नाची चव आणि त्याची ओळख आपल्याला सर्वात आधी होते ती आईने बनवलेल्या
पदार्थ पासून .
मग ते आईने बनवलेले काही असो अगदी लसणाची चटणी किवा भाकरी असो .
माझी आईच छान भाकरी बनवते असेच आपल्याला वाटत असते .
अगदी आपले लग्न होते जर मुलगी असेल तर ,दुसर्या घरात आपण जातो .
त्या घरातील पदार्थ करण्याची पद्धत अलग असते .तरी माझी आई असे बनवते
आणि तेच छान असते यावर आपले ठाम मत असते .
मुले जेव्हा बायको घरात येते .तेव्हा तर लग्नाला किती वर्ष झाले तरी .
"माझी आईना हि भाजी खूप छान बनवत असे आज पण ती चव विसरता येत नाही ,"
हे आपल्या बायकोला कधी ना कधी बोलून दाखवत असतात .
अश्या वेळी कधी कधी थोडा राग येतो पण मनात आपण देखील मान्य करतोच ना .
आई ,आई असते .जेव्हा आपले मुले मोठी होतात तेव्हा ते पण कोणाला तरी हेच
बोलतात .मला ना फक्त आईचे जेवण आवडते .
अनेकदा केवळ रुची पालट म्हणून किवा एन्जॉय म्हणून आपण अनेकदा बाहेरचे खातो .
देखील .आपला म्हणजे अनेकांचे मत असे आहे कि बाहेरच्या पदार्थाला जास्त चव असते .
किती जरी बाहेरचे आवडली तरी नकळत घरचा डाळ भात बरा किवा आपली भाजी भाकरी
बरी असेच म्हणतो आपण शेवटी .
आज लग्नाला एवढे वर्ष झाले तरी आज पण आठवतात .आईने केलेल्या भाज्या .
वांगी असो कारली नाहीतर गवार ,या भाज्या न आवडणारे अनेक असतात .
पण माझी आई या खूप[ छान बनवत असे आणि आज पण त्या माझ्या आवडत्या भाज्या आहे .
मी किती प्रयत्न करते आई सारखे बनवण्याचे पण मला कधी ती चव आली आहे असे वाटतच नाही .
मग किती पण मसाले घाला नाही तर काही करा .
कमी साहित्य घालून आई भाज्या करत असे .कोड्याचा मांडा करणे म्हणतात तसे .
शेवटी काय आई हि आई असते .
माझी आई ना खूप छान जेवण बनवते .मला तर माझ्या आईच्या हाताचे जेवण
खूप आवडते ,असे आपणच नाही तर आपल्या आजूबाजूला असणारे मग ते कोणी असो नातेवाईक मित्र सगळ्यांना आपल्या आईच्या हातचे जेवण आवडत असते .
मग जगातील कुठे किती चवदार काही खाल्ले असेल तरी सुद्धा आपली आईच जगातील
बेस्ट कुक वाटते .
असे का बरे ?
आपण जेव्हा पासून अन्न खाण्यास सुरवात करतो तेव्हा पासून आईच्या हाताने खातो .
तिनी बनवलेले खात असतो .{कधी याला अपवाद आज्जी किवा आणखी कोणी असते }
अन्नाची चव आणि त्याची ओळख आपल्याला सर्वात आधी होते ती आईने बनवलेल्या
पदार्थ पासून .
मग ते आईने बनवलेले काही असो अगदी लसणाची चटणी किवा भाकरी असो .
माझी आईच छान भाकरी बनवते असेच आपल्याला वाटत असते .
अगदी आपले लग्न होते जर मुलगी असेल तर ,दुसर्या घरात आपण जातो .
त्या घरातील पदार्थ करण्याची पद्धत अलग असते .तरी माझी आई असे बनवते
आणि तेच छान असते यावर आपले ठाम मत असते .
मुले जेव्हा बायको घरात येते .तेव्हा तर लग्नाला किती वर्ष झाले तरी .
"माझी आईना हि भाजी खूप छान बनवत असे आज पण ती चव विसरता येत नाही ,"
हे आपल्या बायकोला कधी ना कधी बोलून दाखवत असतात .
अश्या वेळी कधी कधी थोडा राग येतो पण मनात आपण देखील मान्य करतोच ना .
आई ,आई असते .जेव्हा आपले मुले मोठी होतात तेव्हा ते पण कोणाला तरी हेच
बोलतात .मला ना फक्त आईचे जेवण आवडते .
अनेकदा केवळ रुची पालट म्हणून किवा एन्जॉय म्हणून आपण अनेकदा बाहेरचे खातो .
देखील .आपला म्हणजे अनेकांचे मत असे आहे कि बाहेरच्या पदार्थाला जास्त चव असते .
किती जरी बाहेरचे आवडली तरी नकळत घरचा डाळ भात बरा किवा आपली भाजी भाकरी
बरी असेच म्हणतो आपण शेवटी .
आज लग्नाला एवढे वर्ष झाले तरी आज पण आठवतात .आईने केलेल्या भाज्या .
वांगी असो कारली नाहीतर गवार ,या भाज्या न आवडणारे अनेक असतात .
पण माझी आई या खूप[ छान बनवत असे आणि आज पण त्या माझ्या आवडत्या भाज्या आहे .
मी किती प्रयत्न करते आई सारखे बनवण्याचे पण मला कधी ती चव आली आहे असे वाटतच नाही .
मग किती पण मसाले घाला नाही तर काही करा .
कमी साहित्य घालून आई भाज्या करत असे .कोड्याचा मांडा करणे म्हणतात तसे .
शेवटी काय आई हि आई असते .
४ मार्च २०१५
No comments :
Post a Comment