मनातील बोचरे शल्य
मनातील शल्य खूप आहेत ,पण नेहमी जाणवणारे शल्य ते म्हणजे एखादी महिला शिकलेली असेल आणि ती नोकरी न करता गृहिणी असेल तर तिचा बद्दल बाकीच्यांना नेमके काय वाटते .अनेक महिला अशा आहेत त्यांना घरातील लोक नोकरी करू देत नाही .किवा जर नोकरी असेल आणि मुले झाल्या नंतर त्यांना बघयला जर कोणी नसेल तर मग जर नोकरी सोडण्याची जर वेळ आली तर ती स्रीलाच सोडावी लागते .मुले मोठी होतात तो पर्यंत स्रीचे वय वाढते मुले आपल्या विश्वात रममाण होतात .मग ती स्री एकटी पडते .तेच आधी पासून गृहिणीचे असतात त्यांचे बरोबर पण होते .गृहिणी असल्या मुळे तिला खुपदा गृहीत धरले जाते .मग अगदी त्याची सुरवात उठल्या पासून होते ,आपल्या नवऱ्याचा डबा ऑफिसची तयारी सकाळचा नाष्ट,मग मुलाचा डबा शाळेची तयारी यात तिला स्वताकडे बघायला देखील वेळ मिळत नाही .आणि कधी काही वाटले तर "तुला कुठे जायचे आहे ,घरीच तर आहेस "!असे म्हणून तिचा कडे दुर्लक्ष होते .कधी तरी तिला वाटते सुट्टी घ्यावी ,फिरावे ,पण हे सगळे घरातील बाकीच्याना वेळ असेल तर फिरयला जायचे यात तिची आवड निवड कुठे विचारत घेतली जात नाही ,अगदी जेवण बनवतानी देखील मुलांना काय आवडते ,नवऱ्याला काय आवडते हेच पहिले जाते त्यात ती स्वताची आपली एक आवड आहे हे पण विसरून जाते .मग आपण घरात नसतानी हि दिवस भर काय करते याचा पण विचार केला जात नाही .अनेकदा नोकरी करणऱ्या बायका सहज बोलून जातात .यांना काय काम आहे घरी तर असतात.यांना काय काम आहे गोसिपिंग शिवाय .पण खरच सगळ्या तशाच असतात का ? पण अनेकदा बोलयला कोणी नसते ,टीव्ही किती बघणार .मग येतात अशा बायका एकत्र स्वताचे सुख दुख बोलतात पण यांना काय काम असे म्हणून नावे ठेवली जातात .या उलट नोकरी करणार्या बायका काही प्रमाणत आपली आवड निवाड जपू शकतात ,स्वत साठी काही घेऊ शकतात .त्या बाहेर पडतात घर मुले नवरा यापासून अलग वातावरणात काही तास का होईन असतात .मग त्यांना अलग अलग व्यक्ती अलग अनुभव येत राहतात .घर आणि घराचे विचार यापासून दूर असतात . हो त्यांना त्यांची मुले सोडून जावे लागते .मग कधी ते आजारी असतील तरी याचे त्यांना वाईट वाटते मग त्या ते बोलून दाखवतात .स्वता आजारी असेल तर घरी राहून आराम करू शकतात .त्या स्वता कमवतात त्या मुळे त्याच्यात खूप आत्मविस्वास असतो .
पण गृहिणी आजारी जरी असेल तरी तिला सगळी कामे करयला लगतात .याचा कोणी कधी विचार करते का ?नोकरी करणारी असेल तर घरातील तिला मान देतात ,काही प्रमाणत का होईना कामात मदत करतात .पण गृहिणी ला कोणी मदत करत नाही
खूप असे छोटी छोटी कामे असतात .ती देखील केले जात नाही .
{हे माझे विचार आहे माझे शल्य आहे बाकीचे त्याचासी सहमत असतीलच असे नाही }
रेणुका आर्ट्स साहित्य संमेलन २०१५ साठी लिहिलेला लेख
!!आशा !!
No comments :
Post a Comment