Monday, 1 August 2016

मैत्री

दोस्ती ,मैत्री ,सखा किवा सखी.जिवलग असे अनेक नावे आहेत ना ?" मैत्रीचे" !
मैत्रीचा अर्थ खूप व्यापक आणि मोठा आहे .सगळे नाते मिळवणे किवा ते असणे हे आपल्या हातात नसते .पण मैत्री हे असे नाते आहे कि ते आपल्याला नशिबाने मिळते .आईवडील भाऊ बहिण नंतर सगळ्यात जवळचे नाते म्हणजे मैत्री .कधी कधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला काही सांगू शकत नाही तेव्हा कामे येते ती मैत्री .पण वयपरत्वे मैत्री बदलत जाते .


हातात हात घालून शाळेत जाणारे मित्र ,एकच बेंचवर बसणारे मित्र .एकत्र अभ्यास करणारे मित्र ,हातात हात घालून शाळेत जातानाची मैत्री अतिशय निरागस असते .कोणताही स्वार्थ नसलेली .निरगस असते .पण शाळा संपून जाते आणि "मोत्याची माळ धागा तुटून ,मोती जसे बिखारतात तसे मित्र देखील पांगतात .कोण कुठे कोण कुठे जातात .कॉलेज लाईफ सुरु होते .आपण काही करू शकतो हा विस्वास असतो .आणि या काळत होणारी मैत्री आयुष्यात सगळ्यात महत्वाची ,आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरते .जादुई काळ असतो अनेक मोहाचे क्षण समोर असतात .याच कळत चांगले मित्र भेटले तर आयुष्याचे सोने होते .असे मित्र मग कायम कोहिनूर हिऱ्या सारखे हृह्द्याच्या कोपऱ्यात जपून ठेवले जातात .याउलट आयुष्य बेफिरीने जगणारे मित्र भेटले तर आयुष्य वेगळ्या वाटे कडे जाते .आयुष्याची वाट लागते .मग असे मित्र एक वाईट आठवण बनून राहतात .
कामा मुळे वेगवेगळे सहचारी भेटतात .त्यांच्या बरोबर काम करता करता सहवासातून मैत्री होते . नकळत सुख दुखात साथ देवून जाते हि मैत्री .मनापासून हवीहवी आणि गरज असणारी मैत्री असते उतार वयातील .आयुष्य जगून झालेले असते .चांगल्या वाईट गोष्टी आणि सुख दुखाचे अनेक क्षण सोबत असतात . पण वेळ घालवायला तर कधी जीवन साथी अचानकसाथ सोडून गेलेला असतात.आयुष्यातील एकटे पणा वाटून घेण्यासाठी मग मैत्री खूप उपयोगी पडते . वय कोणते असो आपल्याला एक तरी मित्र असावा असे वाटतेच वाटते .आपण न सांगता आपल्या मनातील ओळखणारा......सुखात साथ देणारा ,दुखात पाठी मागे उभा राहणारा .एक तरी मित्र असावा असे वाटतेच .



हर एक फ्रेंड कामिना होता है............
त्यापेक्षा हर एक फ्रेंड जरुरी होता है

No comments :

Post a Comment