Tuesday, 3 May 2016

चित्रपटा आणि समाज

कोणाकोणाला करिस्मा कपूरचा प्रेम कैदी आठवतो .१९९१ कि ९२ मध्ये आला होता.एक प्रेम कथा होता तो पण जवळजवळ २५ वर्षा पूर्वी अश्या कमी वयात येणार्या प्रेमकथा तेव्हा चालत होत्या .आणि  आज अनेकांना सैराट मुळे मुले बिघडतील असे वाटते.त्यावेळची आमची पिढी नाही बिघडली हि नाही बिघडणार.

मी अजून चित्रपट बघितला नाही पण एक वय असतेत्या वयात सावरायचे असते.
आणि सावरणारे असतात आई वडील ...आईवडिलांना बरोबर जर मुलांचा सवांद असेल तर काही होत नाही .आठवा आपल्या कॉलेजचा जमाना ......त्याकाळात मुली मुला बरोबर बोलायचे देखील नाही .तरी कुठे तरी बोलावे वाटायचे ना ?घराबाहेर उभे राहायचे नाही .रस्त्याने चालाताने खाली मान घालून चालायचे.चुकून कधी कोण्या मुलाबरोबर बोललो तर घरातून खूप मोठी चूक केली .असे बोलणे बसत .पण तेव्हा वाटायचे ना ? काय होते बोललो तर ? पण आई वडिलांना उलट उत्तर न करण्याचा तो जमाना होता.पण मनात रागतर यायचा ना? हे असे का वागतात ? खरे तर दोन पिढी मधील अंतर म्हणून आईला समजून सांगता येत नसे ,मग त्यांचे सांगणे म्हणजे रागावणे असे.पण का रागवतातअसा प्रश्न पडायचा ना ? त्या वयाचा तो दोष होता .एक सोळा ते अठरा असे काही वर्ष सरली कि स्वतालाच काय वाईट काय चांगले याची जाणीव होते..
.
आज आपण शिकलेले समजदार पालक आहोत .आपण आपल्याला त्या वयात
काय वाटत होते यावरून ,आपण मुलाबरोबर जे वागतो त्याबद्दल त्यांना काय वाटते किवा काय वाटेल ते समजू शकतो .जास्त विरोध करणे म्हणजे .अजून एखादी गोष्ट करून बघण्याची उर्मी वाढणे.आज मुले मोठे झाल्यावर नाही तर
ती लहान असतानी त्यांना समजून घेतले तर मुला समोर काही आले तरी ते आधी
तुमच्या जवळ येवून बोलतील ..
मुलांचे पालक राहून मित्र बना ,वेळ पडली तर पालक म्हणून शिस्त हवी .आणि
समजून घेतानी काय चूक हे पटवून देतानी एक मित्र ......
खूप पोस्ट बघून असेच मनातले काही

No comments :

Post a Comment