Wednesday, 25 October 2023

अंतिम संस्कार आणि समाज

आपल्या आजूबाजूला असणारे लोक .....कोणी श्रीमंत कोणी गरीब.कोणाचा बंगला कोणाचा फ्लॅट तर कोणाची झोपडी.अनेक विविधता...त्यानुसार ठरत असते माणसांची योग्यता ...हा समाज ठरवतो.

माणसाला मान त्याच्या हुशारी वर किंवा त्याच्यातील कलागुण वर मिळत नाही त्याला मान मिळतो त्याच्या कडे असलेल्या पैश्यावर नाही तर एक गाण्यासाठी लाख रुपये घेणाऱ्या एखाद्या गायक असतो.त्याच्या सारखे कोणी तरी गाणी गात भिक मागत असतात तेव्हा त्याची किंमत काही नाणे असते.मग तो किती छान गात असेल तरी.हे एक उदाहरण झाले.असे उदाहरण अनेक बाबतीत दिसून येतात.

रोज जगताना आपण तरी वेगळे काय करत असतो.आपण देखील एखदया मोठ्या प्रसिध्द असलेल्या व्यक्तीला मान देतो.तो मान त्या व्यक्तीला नसतो तर त्याच्या कडे असणाऱ्या गाडी,बंगला त्याच्या अंगावर असणाऱ्या कपड्यांना असतो.माणसाच्या अंगावर चांगले कपडे नसू द्या त्याला कोणी जवळ उभे करत नाहीत.

आपण शाळेत असतो शाळेचा एक ड्रेस कोड असतो.तेव्हा त्या निरागस वयात जास्त विषमता जाणवत नाही.कधी तिथे एखाद्याचे रूप त्याचे मळके कपडे त्याच्या पायात नसणारी चप्पल किंवा त्याच्या दफ्तर ची क्वालिटी यावरून काही त्यांच्यापासून अंतर ठेवून राहतात.

शाळा मागे पडते आयुष्याच्या शाळेत प्रवेश केला की सगळे बदलते.आधीच सधन असलेले पुढे जातात.गरिबीतून आलेले गरिबी पाचवीला पुजल्या सारखी असते ते गरीबच राहतात.खूप अपवाद असतात.शिक्षणाने त्यांचा कायपालट होतो.या सगळ्यातून ते बाहेर पडतात.

एकच वर्गात असणारे एकच बाकावर बसणारे पुढे जावून खूप सामाजिक अंतर सहन करतात.पैश्या अभावी शाळा सोडावी लागते नाही तर घरातील कोणाच्या तरी मनमानी मुळे सुटते. कुठे तरी काम करून पोट भरणे सुरू असते.आपल्या बरोबरची लोक पुढे गेले याचे दुःख असते.लग्न होते परस्थिती बदलते नाही तर तशीच राहते.नकळत कधीकधी वाईट संगत लागते.व्यसन सुरू होते ते वाढत जाते तेव्हा नकळत सामाजिक दरी वाढत जाते.लोक आपल्याला टाळतात ही भावना अजून व्यसनाधीन करते.मग ती वेळ येते घरातील लोकांना नकोसे होऊन जातात.असे अनेक जीव मग एक दिवस जग सोडून जातात.त्यांच्या जाण्यामुळे कोणाला काडीचा फरक पडत नाही.

असे लोक मात्र अनेक प्रश्न मनात निर्माण करतात.यांना लोक टाळतात याचे दुःख होत आसेल ना?आपला संसार चार लोकासारखा नाही याची खंत असेल का,?त्यांच्या मनात खूप काही असेल का?त्यांना लोकाबरोबर बोलावं वाटत असेल का?
असे लोक जातात जिवंत असताना पोटासाठी वाटेल ते काम करतात.अगदी मिळेल त्या मोबदल्यात.अनेक वर्षानुवर्ष एखाद्या ठिकाणी ते काम करत असतील तर त्यांच्या मृत्यू नंतर ते काम असतील तेथील लोकांना त्यांच्या बद्दल नक्की काय वाटतं असेल.ते त्यांना शेवटाचा निरोप तरी द्यायला जात असतील का?
असे लोक जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या अंत यात्रेत लोकांना जाण्याचा काडीचा रस नसतो.पण त्याच ठिकाणी एखादी मोठी व्यक्ती गेली तर हे लोक स्वतःहून जातात.येथे नाही गेले तरी कोणाच्या लक्षात येणार नसते तरी ही.

मुंबई सारख्या शहरात रेल्वे खाली येऊन बेवारस अनेक लोक मरतात.त्यांचा अंतिम संस्कार करण्याची मोठी जबाबदारी बी एम सी वर येते.अश्या वेळी कोणाला तरी पुढे जावं लागतं.हे सगळे बघून मुंबई पोलीस मधील एक महिला पोलिस हिने अश्या गोष्टी साठी पुढाकार घेऊन आज पर्यंत पाचशे पेक्षा जास्त लोकांचा अंतिम संस्कार केला आहे.ते कोण हे माहिती नसताना.
अश्या वेळी आपल्याला आजूबाजूला रोज दिसणारा एक व्यक्ती मृत्यू पावतो.पण त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या त्याला ओळखणाऱ्या लोकांना मात्र जावं वाटत नाही.हे खूप खटकते.

असेच मनातले काहीत

No comments :

Post a Comment