मी एक छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील आहे .मी बघितली आहे गरिबी येणारा दिवस कसा काढतात ,मुंबई सारख्या शहरात आल्यावर रस्त्याने जाणाऱ्या भारी गाड्याकडे लक्ष जाण्या एवजी हातगाडीवर समान ढकलत जाणाऱ्या कडे लवकर लक्ष जाते .मनात विचार येतो काय मिळत असेल याला दिवसभर कष्ट करून .माझ्या साठी तेव्हा फक्त तो एक माणूस असतो त्यांनी काय घातले आहे किवा ते किती महाग आहे का स्वस्त हा विचार मनात येतच नाही .रोज दिसणारे एक दृश्य आईवडिला पैकी कोणी तरी मुलाला हाताला पकडून शाळेत घेवून जात आहे .बेस्ट च्या बस स्टॉप वर उभे आहे .आई हा सगळा त्रास सहन करते आपल्या मुलांनी काही तरीबनवा म्हणून.माझे लक्ष तिकडे जाते .त्याच वेळी शाळेची बस जाते त्या कडे मी बघत नाही.करण मला माहिती त्या आईवडिलाना बस फी परवडत नाही. मी जी आहे जशी आहे तशा आणि तशा लोकांचा विचार मी करेल कारण मला माहिती आहे त्यांचेदुःख प्रोब्लेम कारण मी ते रोज अनुभवते मला ते माहिती आहे .पण मला नाही माहिती हाय सोसायटी मध्ये काय चालते.त्यांच्यादृष्टीने कोणती कार चांगली आहे तीची किंमत काय आहे .मला माहिती आहे छोट्या हॉटेल मध्ये किती पर्यंत काय भेटेल .पण मला नाही माहिती फाईव्ह स्टार मध्ये काय आणि कितीला भेटते .मला त्याची गरज पण नाही वाटत आणि विचार करावा पण नाही वाटत .कारण माझ्या या शहरात अर्ध्या पेक्षा जास्त लोक गाडीवर वडापाव खावून राहतात.ट्रेन ने प्रवास करतात.असेच मनातले काही
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
No comments :
Post a Comment