Monday, 12 December 2016

वानखेडे

वानखेडे स्टेडीयम 

क्रिकेट आवडत नाही असे फार थोडे लोक असतील .मला लग्ना अगोदर क्रिकेट आवडत नव्हते .खरे तर शेतकरी घरातील मी .आमच्या घरात रेडियो नव्हता .आणि टीव्ही देखील.क्रिकेटचानी  आमचा दूरदूर काही संबंध नव्हता.कपिल देवच्या टीमने वर्डकप जिंकला तेव्हा मी सातवीला किवा आठवीला असेल .


त्यानंतर शाळेतील प्रत्येक वहीवर क्रिकेटपटूचे फोटो असायचे .बस तेव्हडेच काय ते क्रिकेटर माहिती होते .लग्न झाले मुंबईत आले .वानखेडे स्टेडीयम जवळच आहे .कधी गिरगाव चौपाटीवर बसलो कि स्टेडीयम वरील लाईट दिसायच्या .अनेकदा येथे मैच चालू असायच्या .अनेकदा स्टेडीयम जवळून गेले पण कधी आता मध्ये जावून मैच बघावी असे कधी वाटले नाही .कारण क्रिकेटची आवड कमी .
अनेकदा मिस्टरांनी विचारले जाणार का ? पण जाणार कोणाबरोबर हा नेहमीचा प्रश्न कारण मिस्टरांना सुट्टी नसायची ते तिथेच अनेकदा बंदोबस्त साठी असायचे .क्रिकेट आवडायला लागले ते १९९६ मध्ये वानखेडेवर झालेली मैच .नक्की कोणा विरोधी होती आठवत नाही .पण सचिनची बॅटींग बघून मी क्रिकेटच्या प्रेमात पडले .तरी कधी वानखेडेवर जावून मैच बघावी नाही वाटली .

मागच्या आठवड्यात चितळे काकांची वानखेडेवरील पोस्ट वाचली .उगाच वाटले आपण किती जवळ राहतो तरी जात नाही .एकदा जायलाच हावे .वानखेडे स्टेडीयम कसे आहे ते बघावे .त्याच दिवशी मिस्टरांनी मुलीला विचारले जाणर का मैच बघायला .खरे तर तिला कॉलेज असून ती आली.


गेट नंबर सात शोधताना अनेक जण अक्षरशा हातात तिकीट घेवून धावत होते .स्टेडीयम मधून टाळ्या आणि वाद्याचे आवाज येत होते.वातावरण एकदम भारावलेले होते .गेट नंबर सात मधून आत गेले .आणि मस्त सुखद धक्का बसला. M C A Pavikion ची तिकीट होते बाजूला जिथे प्लेअर बसतात त्याच्या बाजूला ,त्याच्या समोर अजिंक्य राहणे बसलेला होता .सगळी कडे नुसता जल्लोष होता .त्याच दिवशी विराटने शतक ठोकले ,पूर्ण स्टेडीयम भरलेले होते .खरे तर टेस्ट मैच बघायला एवढे लोक येतात याचे ज्ञान मला प्रथमच झाले .अगदी समोरून गेलेला यादव आणि विराट बघितले .मैच संपली तेव्हा समोर ग्राउंड वर आलेला अश्विन ,.छोट्या मुलाना आटोग्राफ देणारा आश्विन ..........

त्याच वेळी समोर बघितले तर काय ? रवी शास्त्री समोरून चालत येत होते .नेहमी त्यांच्या मुलखाती बघितल्या आहे .त्यांची कॉमेट्री नेहमी ऐकली .मैच संपली कि काप्तानला मैच बद्दल विचारणारे रवी शास्त्री....एवढा आनंद झाला कि विचारायला नको .

मैच संपली तरी बाहेर अनेक लोक उभे होते .अगदी मरीन ड्राईव्हच्या .सिग्नलाजवळ  लोक खूप वेळ उभे होते .जेव्हा प्लेअर ची बस गेली तेव्हा लोक गेले ,
तेव्हा जाणवले आपण जवळ असून कधी आलो नाही हि चूक केली .


No comments :

Post a Comment