Tuesday, 29 November 2016

निरागस

लहान मुले खूप निरागस असतात असे आपण म्हणतो .किवा त्यांनी काही मागितले कि आपण त्यांना जसे जमेल तसे देतो .मग गरीब असेल नाही तर श्रीमंत आपल्या ऐपती प्रमाणे खरेदी केली जाते .पण कधी कधी मुले नको तो हट्ट करतात .
मागे काही दिवसा पूर्वी मुंबई विमानतळावर{ डोमास्तिक} जाण्याचा योग आला होता.प्रतीक्षा विभागात वाट बघत बसले होते .समोर प्रवास करून येणारे प्रवाशी गेट मधून बाहेर येताना दिसत होते .कोणी एकटे कोणी परिवारा बरोबर काही एकदम खुश तर काही त्रस्थ ..........


गेट मधून असेच एक परिवार बाहेर आले त्यांचा बरोबर एक दोन तीन वर्षाचा मुलगा होता.आजी आई बाबा आणि तो ....आई च्या हाताला पकडून चालत होता .म्हणण्या पेक्षा त्याची आई त्याला खेचत घेवून जात होती आणि तो रडत होता.अचानक त्याने आईचा हात सोडला आणि तो जमिनीवर लोळायला लागला.छान ड्रेस घातलेला तोछोटा मुलगा आपले आई ऐकत नाही बघून त्याने असे केले असणार .ते बघून मला गम्मत वाटली .विमानतळ म्हणजे काही एखादी गल्ली किवा रस्ता नाही .त्याचे आई वडील पण चांगले श्रीमंत वाटत होते .
गाच मला दिवाळी खरेदी वेळी गावच्या बाजारात आईच्या मागे रडत जाणारे मुले आठवले .आईने घेतलेले कपडे आवडले नाही का ते सरळ आपण कुठे आहे हेबघत नसायचे आणि जमिनिवार मातींत लोळण घायचे त्याबरोबर जोरजोरात रडायचे.हात पाय आपटायचे आपल्याला हवे ते मिळत नाही तो पर्यंत हे चालू राहायचे.पण त्याच वेळी आईवडिलांची अवस्था काय होत असणार हे त्यांना समजत नसायचे.पैसे असेल तर हवे ते घेता येत असे नाही तर अजून मार मिळत असे .तसाच आपल्या रडणाऱ्या मुलाला घेवून मनातून दुखी होत ते जायचे.

ठिकाण कोणते असो ,परस्थिती कोणती असो .मुलांची मानसिकता सारखी असते हेच खरे .आपल्याला जे हवे ते मिळत नसेल तर असे काहीकरा बाकी लोकांचे लक्ष जाईन आणि आई बाबा आपल्याला हवे ते घेतील हा त्यांचा हिशोब असतो .

असे करताना सहज आपल्या आईबाबांना मुलाला काही वळण नाही लावले का असे बोलून जातात या गोष्टीचे त्या निरागस मुलांना जाणीव नसते .


चार लोकात कोणी नाव ठेवू नाही म्हणून आईबाबा हवे ते मुलांना घेवून देतात.मग मुले बरोबर लक्षात ठेवतात .आपण माणसांत असे वागले कि आपल्याला हवे ते मिळते .मग ते श्रीमंत असतील नाही तर गरीब ,मग तो गावचा बाजार असेल नाहीतर विमानतळ नाही का? 

असेचमनातले काही

No comments :

Post a Comment